तेव्हा दोघीनांही


तेव्हा दोघीनांही 
ताकीद होती 
उंबरठा न ओलांडण्याची 
फक्त तू चामड्याची म्हणून 
उंबरठ्या आत न येण्याची 
आणि मी कातड्याची 
म्हणून बाहेर न जाण्याची 
आता काळ बदललाय 
तू ही  बदललीस 
मी ही बदलले .
तू उबरठ्या आत येउ लागलीस 
अन मी उबरठ्या बाहेर जाऊ लागले  
वाटलं खूप काही बदलेल  
अखेर चामडं चामडंच राहिलं 
आणि कातडं कातडंच 
जेव्हा आदळले ते शब्द 
पायातली वहाण 
पायातच बरी !

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज