तेव्हा दोघीनांही
तेव्हा दोघीनांही
ताकीद होती
उंबरठा न ओलांडण्याची
फक्त तू चामड्याची म्हणून
उंबरठ्या आत न येण्याची
आणि मी कातड्याची
म्हणून बाहेर न जाण्याची
आता काळ बदललाय
तू ही बदललीस
मी ही बदलले .
तू उबरठ्या आत येउ लागलीस
तू उबरठ्या आत येउ लागलीस
अन मी उबरठ्या बाहेर जाऊ लागले
वाटलं खूप काही बदलेल
अखेर चामडं चामडंच राहिलं
आणि कातडं कातडंच
जेव्हा आदळले ते शब्द
पायातली वहाण
पायातच बरी !
Comments
Post a Comment