Posts

Showing posts from May, 2016

History

इतिहास  शाळेत बऱ्याच जणांना न आवडणारा विषय. पण मला मात्र इतिहास विषय बद्दल कुतूहल वाटायचे आणि त्याबद्दल बरेच प्रश्न हि पडायचे. पहिला प्रश्न हा कि ह्या इतिहासातल्या गोष्टी कोणी लिहिल्या ? कारण त्या सर्व  गोष्टींना  इसवीसन शके  अमुक अमुक साली लिहित. हे इतक कोणी आणि का लिहित असेल ? बर ते सांभाळून का ठेवत असतील आणि कुठे ठेवत असतील ? लिहिणाऱ्या माणसाचं अक्षर छान असेल का ? तो कुठल्या पेनने लिहित असेल ? आमच्या पेपर वर पाणी पडल कि त्याची अक्षर पुसट  होतात त्यांची कशी  इतकी दीर्घकाळ चांगली राहतात ?  शिवाय त्याने ते जाड पानांच्या वहीत लिहील असेल का ? तेव्हा बाईडिंग ची सोय नसताना ते सुरक्षित कस राहील ? आमची पुस्तक तर पुढच्या वर्षा पर्यंत हि टिकत नाहीत ह्यांचीच कशी टिकतात ? आणि लिहील तर  लिहू दे ना !  पण आम्हाला  का ते शिकवावं ? ह्यातून  काय फायदा ?  हे आणि  असे किती तरी प्रश्न मला पडत. जसे जसे वरच्या इयत्ता मध्ये गेले तस तशी इतिहासाची गोडी लागली. एक सनावळ्या सोडल्या तर बाकी कशाचा त्रास ...

Pustak Mitra

पुस्तकाची  कैफियत   किती दिवस झाले तुझी चाहूल नाही हळुवार मायेचा स्पर्श  हरवलाच जणू काही अजून किती वेळ  ओठ मुडपून राहायचं  संवादाच्या विरहाने आत आत झुरायचं आता कंटाळा आलाय या बंदिस्त जगण्याचा आठवतो तो  दिवस तुझ्या हातात झुलण्याचा कितीदा तू तेव्हा  मला प्रेमाने कुरवाळलस  मला  गमवण्याच्या भीतीने तुझ  नाव लिहिलंस तुझ्या उपेक्षेचं ओझं आता कुठवर पेलायचं गत स्मृतीनेच आता माझ्या मनाला रमवायच तुला आवडलेल्या ओळीं वरती हळुवार खुणा करताना मी मनोमन आनंदलो होतो तो अर्थ जाणून घेताना आपल्या मैत्रीच्या सुरांच कसं एकच गाणं बनायचं तुझ्या संदर्भ खुणेलाही (बुकमार्क ) मी उरी जपायचं आठवतात का ते दिवस, तु मला कुशीत घेऊन निजताना वाचता वाचता मिटल्या  डोळ्यांनी पुढली  पाने भिजताना कधी चहा पिता पिता ,तर कधी जेवताना सोबत असायचो तुझ्या पहिल्या वहिल्या प्रेमपत्राला हळूच मिठीत घ्यायचो कधी जपलेल्या मोरपिसाला, तर कधी सुकलेल्या फुलांचा सुगन्ध मी दडवायचो तू माझा नि...