ग्रंथ संवाद !
ग्रंथ संवाद ! काल म्हणजेच ३१ जानेवारीला २०१६ ला निवारा सभागृहात ग्रंथ संवाद चा प्रकाशन सोहळा साजरा झाला. तो माझ्या आयुष्यातील पहिला वाहिला प्रकाशन सोहळा होता. त्यामुळे नक्की काय काय असणार आहे ? या बाबत मला प्रचंड उत्सुकता होती. डॉक्टर न . म . जोशी आणि डॉक्टर अनिल अवचट यांना प्रत्यक्षात पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली. त्याबाबत संगीता कुलकर्णी यांचे आणि बापट सरांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला गोखले सरांमुळे मिळाली त्यामुळे त्यांचे हि आभार . डॉक्टर अनिल अवचट यांनी साहित्यात नव्याने शिरू पाहणाऱ्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे विपुल साहित्य वाचावे, जीवनात आलेले अनुभव स्वताचे आणि इतरांचे ह्यानेच लेखनाला स्फूर्ती मिळते. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या जवळ देखील जीवन जगण्याची कला असते. त्यांचे आयुष्य अनुभव समृद्ध असते. साहित्य हे केवळ अनुभव व त्यामुळे आलेले शहाणपण व्...