Posts

Showing posts from January, 2016

ग्रंथ संवाद !

ग्रंथ संवाद !            काल म्हणजेच ३१ जानेवारीला २०१६ ला  निवारा सभागृहात ग्रंथ संवाद चा प्रकाशन सोहळा साजरा झाला. तो माझ्या आयुष्यातील पहिला वाहिला प्रकाशन सोहळा  होता. त्यामुळे नक्की काय काय असणार आहे ?  या बाबत मला प्रचंड उत्सुकता होती. डॉक्टर  न . म . जोशी आणि डॉक्टर अनिल अवचट यांना प्रत्यक्षात पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली. त्याबाबत संगीता कुलकर्णी यांचे आणि बापट सरांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला गोखले सरांमुळे मिळाली त्यामुळे त्यांचे हि आभार .          डॉक्टर अनिल अवचट यांनी  साहित्यात नव्याने शिरू पाहणाऱ्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे विपुल साहित्य वाचावे, जीवनात आलेले  अनुभव स्वताचे आणि इतरांचे ह्यानेच लेखनाला स्फूर्ती मिळते. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या जवळ देखील जीवन जगण्याची कला असते. त्यांचे आयुष्य अनुभव समृद्ध असते. साहित्य हे केवळ अनुभव व त्यामुळे आलेले शहाणपण व्...

Jatan Karu Ya Sanskrutichya Paul Khuna

जतन करू या संस्कृतीच्या पाउल खुणा  वाई म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव. अगदी वाहवा ! काय हि ईश्वरी लीला ! अस म्हणावं इतकं  छान. हे गाव दोन गोष्टींसाठी  खूप प्रसिद्ध आहे. एक म्हणजे निसर्ग सौंदर्य व दुसर म्हणजे तिथली प्राचीन देवालय . इथे आल्यावर अंतर्बाह्य सौंदर्याचा अनुभव आल्यासारखं वाटत. मनात विचार येतो, बाहेरील नैसर्गिक सौंदर्याचा प्रभाव मंदिरातील वातावरणावर, भाविकतेवर पडला आहे कि मंदिरातील पवित्रतेचा , शांततेचा प्रभाव इथल्या निसर्गावर पडला आहे. हिरवेगार , निळशार यांसारखे शब्द आपण इथे अनभवू शकतो . प्रमाणबद्धता, सुबकता, रेखीवता हे शब्द देखील मंदिराच्या, शिल्पाकृतीच्या कडे निरखून पाहताना अनुभवायला येतात. इतकी येथील मंदिरे सुंदर, रेखीव आहेत. पण खटकणारी गोष्ट मात्र अशी आहे की  या मंदिराची तेथील शिल्पकृतींची देखभाल , जपणूक  हवी तशी केली जात नाही. खरतर मंदिर म्हंटल की आपल्याकडे त्याबाबत वेगळ्या नजरेने पहिले जाते.  त्यात धार्मिकता व भावनिकता जोडली जाते. असे असतानाही ह्या मंदिरांची काही शिल्पे हि तुटलेली, भग्नावस्थेत तर काही नामशेष होण्...

Eka Prem Vedya Mushafirala Salam !! Salam!! Salam!!

एका प्रेमवेड्या मुशाफिराला                                   सलाम ! सलाम ! सलाम !        जीवनाचे गाणे आनंदाने गात गात मजेत जगावे असे सांगणारे आणि  प्रत्यक्षात स्वत : तसे जगणारे आपले लाडके कवी मंगेश पाडगावकर हे आता आपल्यात नाही हि खंत कायमच मनात राहणार आहे. तरी देखील त्याचं शब्दातून आपल्याशी संवाद साधण  हे चालूच राहणार आहे ते केवळ त्यांनी केलेल्या त्यांच्या अजरामर कवितां मुळेच.          एखादा कलाकार हा नेहमीच त्याच्या रसिकांशी  त्याच्या कलाकृतीद्वारे संवाद साधत असतो . त्याच्या मध्ये आणि आपल्या मध्ये नकळत एक ऋणानुबंध तयार होत असतो . आणि त्यासाठी प्रत्येकवेळी त्याच्याशी भेटण्याची च गरज आहे अस नसत. कवी मंगेश पाडगावकर यांच्या बाबतीत तसेच आहे. प्रत्यक्षात त्यांना कधी भेटण्याचा योग आला नाही तरीही त्यांच्या कवितां मधून ते नेहमीच  भेटत गेले.   लहानपणी "सांग सांग भोला नाथ पाउस पडेल काय ?" हे गाण म...