Posts

Showing posts from May, 2019

मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक

विचारभारती या मासिकात मोहिन चित्रशैली वरचा माझा लेख छापून आला आहे. संपादक मिलिंद जोशी सर आणि मिलिंद देशपांडे आणि त्यांचे सहकलाकार या दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद !   चित्रकलेचं आणि माणसाचं नातं हे फार फार प्राचीन काळापासूनचं आहे. माणूस बोलायलाही लागण्याआधी चित्रांच्या सहाय्यानं संवाद साधत होता. आपल्या गुहेतल्या भिंतीवर तो नैसर्गिक रंग आणि कुंचल्याच्या सहाय्यानं चित्रांद्वारे आपल्या भावना व्यक्त करत होता. कालांतरानं जसं आदिमानवाची उत्क्रांती होत होत तो प्रगत होत गेला, त्याच्या शरीरात, राहणीमानात, वर्तनात बदल होत गेला; तशी भावना व्यक्त करण्याची त्याची पद्धतही बदलत गेली. पुढं पुढं तर भाषेचाही उगम आणि विकास झाला. तसं सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगतीही झपाट्यानं होऊ लागली. स्थिर आणि सुरक्षित अशा जीवनात मग त्याच्या या भित्ती चित्रांची जागा वेगळ्या माध्यमानं घेतली. आणि मग चित्र काढण्याच्या विचारात, पद्धतीत, विषयात ही अमुलाग्र बदल घडू लागला. त्यामध्ये तात्कालीन जीवन संस्कृतीचं, समाजाचं, नीतीमूल्यांचं चित्रण दिसू लागलं. आणि त्या त्या पद्धतीनुसार त्या त्या चित्रांमध...

अट

कोरे कागद, रंग, पेन्सिली, शार्पनर, पट्टी, खोडरबर असा सगळा जामानिमा घेऊन बसलं तरी काही केल्या रमाला चित्र कोणतं काढावं ते सुचेना. सुट्टीत रोज एकतरी चित्र काढेनच असं तिनं तिच्या बाबांना प्रॉमिस केलं होतं. सुरुवातीचे काही दिवस उत्साहात पार पडलेही होते. मासिकातली, पुस्तकातली आवडती रेखाटनं, चित्रं शोधून ती एका वहीत चिकटवूनही ठेवली होती. आणि आता यातलं एकेक चित्र बघून काढायचं असं सुरुवातीला तिनं ठरवलं खरं पण आता तिलाच ती एकसारखी चित्रं पाहून तसंच काढण्याचा कंटाळा आला होता. पण रोज एक चित्र काढायचं म्हणून तर बाबांनी त्यांचा कॅन्व्हास, ड्रॉइंग बोर्ड, त्यांच्या पेन्सिली असं सारं काही रमाला वापरायला दिलं होतं. ज्या दिवशी चित्र काढलं जाणार नाही त्या दिवसापासून बाबांचं हे सगळं सामान रमाला वापरता येणार नव्हतं. शिवाय बाबांची अजून एक अट होती. खरंतर चित्र काढण्यापेक्षा ती ‘अट’ सांभाळणंच रमाला अवघड जात होतं. आपण निवडलेलं चित्र का निवडलं? त्यात काय वेगळेपण आहे असं तिला सांगायचं होतं. प्रत्येक चित्रातलं वेगळेपण हुडकणं हे खूपच कठीण काम आहे असं रमाला जाणवू लागलं. शिवाय चित्राची माहिती...

बाग - कथुली

बाग “तुझ्या तुळशीच्या रोपाकडे बघ गं. काय झालंय ? तुळस नीट बहरेल की नाही शंकाय.” घरात येताच आईचं हे वाक्य कानावर पडलं तशी रमा धावतच तुळशीच्या रोपाकडे गेली. बघितलं तर रोप तसंच होतं. त्याला काही झालं नव्हतं. मग आई का असं म्हणतीय? रमा गोंधळली. हातपाय स्वच्छ धुवून ती पुन्हा कुंडीजवळ गेली. तिनं नीट निरखून पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तुळस वाढण्याऐवजी दुसरंच काहीतरी उगवलंय त्यात. हं ... हे तण आहे तर... असा विचार कर असतानाच तिला काही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.  बाबांच्या एका मित्राची बाग बघून आल्यानंतर ती बाबांच्या मागे लागली होती. आपण पण बाग करूया नं. तेव्हा बाबांनी तिला समजावलं होतं “बाग करणं इतकं सोपं नाही रमा ! एखाद्या माणसाइतकीच निगुतीनं त्याची काळजी घ्यावी लागते. नुसती कुंडी आणली, त्यात रोप लावलं, त्याला खत, पाणी, उन इतकं दिलं की बाग तयार होते असं नाही काही. त्याला खूप जपावं लागतं. त्यात तण होऊ नये म्हणून, पक्षी सुद्धा कधी कधी छोटा कोंब खाऊन टाकतात. त्यापासूनही जपायला लागतं. इतकं सगळं जमेल का तुला ?”   तेव्हा तिनं उत्साहात होकार दिला होता. “ठीक आहे मग. तुला आता सु...

खिडक्या अर्ध्या उघड्या

तर दिसतं असं की, उंचीवरच्या माणसांनाही दरीची खोली भिववतेच; कारण स्वतःच्या जगण्याचा ते केंद्रबिंदू झालेले असतात. निसर्गनियमाप्रमाणे जेव्हा चढ येतो तेव्हा उतारही असतोच. मात्र याची जाणीव होईस्तोवर बऱ्याचदा उशीर झालेला असतो म्हणजे घडतं असं की, माणसं आपल्या जगण्यातून स्वतःच स्वतःसाठी समस्या निर्माण करतात आणि त्यात अधिकाधिक अडकत जातात.  'खिडक्या अर्ध्या उघड्या' या गणेश मतकरींच्या कादंबरीवजा कथासंग्रहातून ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. या कथांमधल्या व्यक्तिरेखा या उच्चभ्रू समाजातल्या आहेत. रोजच्या रोजीरोटीच्या, जातिभेदाच्या समस्या त्यांच्या आयुष्यावर फारशा परिणाम करू शकत नाहीत. मात्र वरती म्हटल्याप्रमाणे आपल्याच जगण्याच्या उंचीचं आता त्यांना भय वाटू लागलं आहे. ही उंची काही कायम राहू शकणार नाही याची जाणीव झाल्यावर त्या या उंचीच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना जगण्यासाठी केवळ उंचीच आवश्यक नसून खोलीही तितकीच आवश्यक आहे हे त्यांना जाणवू लागतं.  मग अर्ध्या का होईना उघड्या खिडकीतून आपल्यापेक्षा वेगळं बाहेरचं जग पाहू लागतात आणि समस्यांच्या मुळाशी पोहोचतात. त्या...

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

छत्री घेतली म्हणजे पाऊस नाहीसा होतं नाही पण पावसात आपण स्थिरतेनं उभं राहू शकतो. स्वतःला कोरडं ठेवू शकतो. हे सत्य निरनिराळ्या व्यक्तिरेखांतून, भुमिकांतून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे 'नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हा कथा संग्रह. या कथा वाचत वाचत आपण सहजगत्या विषयाच्या मूळापाशी जाऊन पोहोचतो.  मनुष्याच्या जन्मापासूनच त्याच्याशरीराचा भाग असणारी नाभि त्याच्या काही समस्यांशीही नकळतपणे जोडली गेली आहे. त्या समस्यांची मुळं तीच्या पोटात दडली आहेत.  या समस्या जुन्यापुराण्या आहेत. कित्येकदा त्या आपापल्यापरीनं सोडवण्याचा प्रयत्नही माणसानं केला आहे. पण त्याच्या मुळापर्यंत न जाता वरवरच्या इतर गोष्टींनाच महत्त्व दिल्यानं त्या अधिकाधिक जटील झाल्या आहेत. जगण्याच्या संघर्षाचं प्रमुख कारण ठरल्या आहेत. मानवी नात्यांवर, जगण्याच्या बदलत चाललेल्या मुल्यांवर ,एकूणच माणसांच्या आणि मनुष्येतर जीवांच्याही सहजीवनावर पुर्नविचार करायला लावणार्या या 'नाभि'कथा आहेत. त्यामुळं प्रणवच्या या कथांतून तुटलेली छत्री आणि बदनाम झालेला काळा तलावही आपलं मन 'मोकळं' करत...

जागतिक कविता दिन

आज २१ मार्च जागतिक कविता दिन. कविता या साहित्यप्रकाराचं ‘जतन’ आणि ‘संवर्धन’ करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. अगदी याच भावनेतून गेली एकोणीस वर्षं म्हणजे २००० सालच्या एप्रिलपासून ‘कुसुमाकर’ हे कवितेला प्राधान्य देणारं मासिक प्रकाशित होत आहे. भांडूप येथील कवी, लेखक, संपादक, प्रकाशक ‘श्याम पेंढारी’ हे याचे सर्वेसर्वा आहेत. नवोदित आणि प्रथितयश अशा दोन्ही कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं हे मासिक सुरु झालं ते एका काव्यमंचापासून.  १९९५ साली पेंढारी सरांनी ‘काव्यगंध’ न ावाचं मंडळ स्थापन केलं. कवींनी एकत्र येऊन आपापल्या कविता सादर कराव्यात, त्यांच्यावर चर्चा घडाव्यात, विचारांची, मतांची देवाणघेवाण व्हावी हा याचा उद्देश होता. साधारणपणे चार एक महिन्यांनी ते एखाद्या नामवंत कवीला बोलावून कवी संमेलनही भरवत असत. संमेलनाला कवींचा उत्तम प्रतिसाद मिळायचा. एकूण प्रवासात चारशे-पाचशे कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमांचं आयोजन सदस्यांच्या मासिक वर्गणीतून करीत असत. कवितेच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हा त्यांचा व्यासंग होता. या कामात त्यांना कवयित्री सीमा बिठाणे, कवयित्री ...

संवादी कुलुप

माझ्या लहानपणीची गोष्ट. तेव्हा आम्ही चाळीत रहायचो. घरोघरी फोन नसण्याचा आणि सांगून वेळ ठरवूनच कुणाकडे जावं इतकी औपचारिकता पाळण्याचा तो काळ नव्हताच. माणसं एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक असायची. त्यामुळं आपण कुणाकडे जाणार असलो किंवा कुणी आपल्याकडे येणार असलं तरी शेजारीपाजारी सांगून जायची पद्धत होती. किंवा अगदी शेजारीही नसतील तर मात्र दरवाजाचं कुलूप शेजाऱ्याचं काम करायचं. समजा आपण अपरिहार्य कारणामुळे बाहेर जाणार असू आणि कोणी येणार असेल तर अशा परिस्थितीत आमचं कुलूप आमच ्यावेळेला दोस्तासारखं धावून यायचं. आम्ही येणाऱ्याव्यक्तीसाठी कुलुपाला छोटीशी चिठ्ठी अडकवून जायचो. ती चिठ्ठी अडकवण्याचीही एक सांकेतिक पद्धत होती आणि वाचणाऱ्याला ती बरोबर समजायची. असंच आम्ही एकदा बाहेर गेलो होतो आणि आमच्याकडे बाबांचे एक मित्र म्हणजे काळे काका आले. घराला कुलूप पाहिल्यावर शेजारी गेले तर शेजारील घरही कुलुपबंद. मग त्यांनी आमच्या कडी कुलुपाच्या मधल्या जागेत एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या सोबतच एक छोटसं चाफ्याचं फुल ही चिठ्ठीत गुंडाळून ठेवलं. त्याचं काम झालं होतं. त्यांची खेप काही वाया गेली नव्हती....

मधुमालती

आठवणींच कुलूप उघडलं की दरवाजा उघडण्याची वाटही न पाहता मिळेल त्या फटीतुन बाहेर येऊ पाहतात हेच खरं. परवा संध्याकाळी युटर्न घेता घेता एका बंगल्यातनं हळूच बाहेर डोकावणारी मधुमालती नजरेस पडली. तीच्या जवळून जाताना तीचा ओझरता स्पर्श झाला तेव्हा एक मंद सुवास आला आणि त्याच्या सोबतच मला कवी बाईंच्या शाळेत घेऊन गेला.  मधुमालतीचं झाड म्हणजे आपली शाळा आली अशी एक खुण होती. शाळेत जाताना मधुमालतीचे घोसच्या घोस फुललेले असायचे. तेव्हाची घरगुती बालवाडीची शाळा होती ती. पण अंगण स्वच्छ ध ुतलेलं. दारात रेखीव रांगोळी आणि सोबतीला असंख्य फुलांचा वास दरवळणारा आणि थंडावा देणारी सावली. सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत प्रेमळ, मनमिळावू अशा कवी बाई. कधीच कोणावर न रागावणाऱ्या. शाळेतल्या सगळ्या मुलांवर विलक्षण प्रेम करणाऱ्या. तर ही मधुमालती इतकी फुललेली असायची की तिच्या वेलीच्या कमानीखालुन जावं लागायचं आणि आम्हाला ते फारच आवडायचं. थोडे पाय वर करून किंवा उड्या मारून आम्ही ती फुलं तोडण्याचा प्रयत्न करायचो. कधी मिळायची, कधी मिळायची नाही. जी मुलं उंच होती. त्यांना पटकन तोडता यायची. आपण पण उंच असाय...

आठवणी गुणगुणतात तेव्हा...

परवा एका कार्यक्रमात 'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' हे गाणं कानावर पडलं... अन् नकळत मी ते गुणगुणायला लागले ते अगदी थेट घरी येईपर्यंत. बराच वेळ आपण तेच गाणं गुणगुणतोय हे पटकन लक्षातही आलं नाही... पण मनाला एकदम मोकळं वाटलं. अरे वा! आज इतकं का प्रसन्न वाटतंय ? यावर नकळतच विचार चालू झाला. मोठं झालं की असं असतं, मन आनंदी असलं तरीही आपण लगेच त्याचं कारण शोधतो. असं कारण शोधताना जाणवलं की, अरे हे गाणं आपण कुंटेबाईंच्या क्लासमध्ये म्हणायचो. आमच्या घराजवळच हा क्लास होता. जवळपास महिनाभर हे गाणं त्या आमच्याकडून घोटून घेत होत्या. सुट्टीतला तो क्लास, भर दुपारची तीन ते चार वेळ आणि आम्ही मस्त जेवण करून पायीपायी क्लासला जायचो. काही दिवसांनंतर मात्र त्याच-त्याच गाण्याचा कंटाळा यायला लागला... पण इलाज नव्हता. या आठवणीबरोबरच मग गाण्याच्या कितीतरी आठवणी निघाल्या. खास करून माणसांच्याच... एखादं गाणं पहिल्यांदा कुणाच्या तोंडून ऐकलंय बरं... सगळ्यांत पहिली आठवली अश्विनीकाकू, अश्विनी मेढेकर. 'मागे उभा मंगेश' हे गाणं कधीही, कुठंही लागलं तरी पटकन अश्विनीकाकूच डोळ्यांपुढ...

'चैत्रांगण' कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा!

झुंजूमुंजू झालंय. पाखरांचा चिवचिवाट चालू झालाय हवेत सुखद गारवा आहे. आणि वातावरणात एक शांत प्रसन्न नाद भरून राहिलाय. सगळीकडे सडासमार्जन चालूये, लगबग चालू झालीय. मधूनच स्त्रोत्र पठणाचे स्वर ऐकु येतायत. काही स्त्रिया तुळशीवृंदावनापाशी वाकून एक सुरात काहीतरी म्हणत रंगावली काढत आहेत. एक सारख्या लयीतल्या त्या मोहक वळणदार रेषा काही उगाच शोभेपुरत्या रेखाटल्या नाहीयेत. तर त्या रंगावल्या जणू साऱ्या विश्वाचं प्रतिक बनून या भूतलावर स्थानापन्न झाल्या आहेत.  खरतरं तो आहे कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा. अगदी चैत्राच्या आरंभापासून त्याच्या समाप्ती पर्यंत चालणारा.  अंगणाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या त्या नक्षीदार तुळशी वृंदावनात हिरवा हिरवा शालू नेसलेली तुळस प्रसन्नतेनं डोलत उभी आहे. जणू काही वाऱ्याला सांगतेय पहा बरं ! आज माझ्या भोवतालचं वातावरण किती गंधित, किती विलोभनीय झालं आहे. वाराही त्या दर्शनानं क्षणभर थबकलाय. आणि रक्तवर्णीय पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या त्या शुभ्र रेखीव आकृत्या आपल्या नजरेत सामावून घेतोय. इतक्यात त्या चैत्रांगणाला पाहण्यासाठी सूर्य देखी...

उन्हाळा

तुम्ही कितीही नाकं मुरडा त्याला तरीही तो येतोच नेमानं. आणि सगळं वातावरण उजळवून टाकतो आपल्या अस्तित्वानं. त्याचा रखरखीत स्पर्श नकोसा असला तरी त्याच्या खाली थोडी का होईना ओल असतेच की. मला तर तो शिवासारखाच भासतो. संहार आणि निर्मिती या दोहोला कारणीभुत असणारा. सृष्टीच्या कल्याणासाठी स्वत: देखील संन्यस्त राहणारा.  आपल्या रुक्षत्वाची खोल आणि ओल जाणिव असतेच की त्याला , म्हणून तर त्याची परतफेडही तो वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. आपण फक्त त्याला नीट जाणलं पाहिजे. आंबा, कैरी, कलिंगड, टरबु ज, उस अशा नानाविध रसदार, चित्तवृत्ती शांत करणार्या फळांची लयलूट करतो तो. दिवसाचे कितीतरी प्रहर त्याच्यामुळं अनुभवायला येतात. आणि चैत्रगौरीचं हळदी कुंकू, पन्हं, कैरीची डाळ यासगळ्यानं रूक्षपणा कमी करून वातावरणात आपलेपणाचा गारवा आणायचा प्रयत्नही करतोच तो. निसर्गाच्या प्रत्येक घटकात प्रकाशाचे उजळ रंग भरतो. अगदी झाडांच्या सावल्यासुद्धा मोहक वाटतात. रात्रीचं निरभ्र आकाश, चमचमणार्या चांदण्या, सोबतीला मोगरा आणि रातराणी, चाफा यांचा सुगंध, माठातलं वाळ्याचं पाणी, उसाचा रस. हे सगळं अनुभवण्यासाठी उन...

हरवलेल्या मंदिराचे रहस्य

पुस्तक वाचण्याची आवड असलेला माणुस कोणतंही पुस्तक वाचतो मग ते बालवाङ्‌मय का असेना. उलट त्यामुळं प्रसंगी लहान-मोठं होण्यातली मजाही तो अनुभवू शकतो. मला अशीच मजा अनुभवायला मिळाली ती सुधा मूर्तींच्या "हरवलेल्या मंदिराचे रहस्य" या अनुवादीत पुस्तकामुळं. मेहता पब्लिशिंगचं हे पुस्तक येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी आर्वजून वाचावं असं आहे. यातल्या अनुष्काच्या करामती वाचताना आपण आपल्या लहानपणी वाचलेल्या "चिंगी" ची आठवण होते. क्वचित प्रसंगी ही आधुनिक चिंगीच आहे की काय असंही वाटून जातं. त्यामुळं आपल्या मनात बालपण जपून असलेल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही. किंबहुना ज्यांच्या लहानपणीच्या सुट्टया आजोळी गेल्या आहेत त्यांना तर ते बालपणीचे दिवस नक्की आठवतील. याशिवायही या पुस्तकात अजुन खुप गमती जमती आहेत, काही उल्लेखनीय गोष्टीही आहेत. पुस्तकाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्याची प्रस्तावना. फारच सुंदर आणि योग्य पद्धतीनं लिहली आहे. शिवाय हे पुस्तक सुधा मूर्तींनी त्यांच्या नातीला म्हणजेच अनुष्काला अर्पण केलं आहे. तर अशा या धाडसी अनुष्काच्या करामती सांगणाऱ्या...

नोंद

नोंद वाचता वाचता आवडलेल्या ओळींवर हळुवारपणे पेन्सिलने खुणा करायची रमाला सवयच होती. आजही एक वाक्य तिला आवडलं ‘जेवढा अंधार असतो, त्या आकाराचा दिवा लागत नाही. अंधार मोठा असतो, पण दिवा छोटा असला तरी अंधार घालवता येतो.’ अहाहा ! काय सुंदर वाक्य आहे हे. एका वाक्यात आख्ख्या लेखाचा सारांश आलाय. इतकं छान वाचल्यावर आजच्या वाचनाचं सार्थक झालं. आजचा दिवस चांगला जाणार असं तिला वाटू लागलं. वाक्य पुस्तकाइतकंच मनात नोंदवलं गेलं.  पहाटेच्या रम्य वेळी हातात चहाचा कप आणि सोबतीला असं एखादं पुस्तकं असेल तर तो दिवस शुभ आहे असं मानायला हरकत नाही असा विचार तिच्या मनात यायला आणि देवळात घंटानाद व्हायला एकच गाठ पडली. अतीव समाधानानं तिनं पुस्तक मिटलं. घंटानादाच्या तालावर एखाद्यानं आरती म्हणावी तशा तल्लीनतेनं ती ते वाक्य पुन्हा पुन्हा म्हणू लागली.  खरंच पुस्तक वाचण्यातनं माणसाला काय मिळू शकेल हे काही सांगता येत नाही. आईचं हे वाक्य तिला पुन्हा आठवलं. त्याचबरोबर सवड मिळेल तेव्हा पुस्तकं वाचणारी आईही आठवली. ‘तुला असं सतत वाचून वाचून कंटाळा येत नाही का गं ?’ एकदा न राहवून तिनं आ...

अर्पण...

अर्पण... संध्याकाळ ढळू लागली होती. पाखरं घरट्याकडे फिरकू लागली होती. दिवसभराचा शिणवटा आता वाऱ्याच्या झोतातुनही जाणवू लागला होता. घराघरात दिवे लागण झाली होती. रस्त्यावरची रहदारीही तशी मंदावलीच होती. नुकत्याच चांदण्या उमलू लागल्या होत्या.  अशातच नेहमीचा घंटानाद झाला. अन् तो ऐकताच रमा मात्र अस्वस्थ झाली. तिच्याही नकळत तिची पावलं भराभर पडू लागली. जणूकाही भारावल्यासारखी ती चालू लागली. वळणवाटा सरावानं मागं पडत चालल्या होत्या. आता रहदारीही दुरावली. अन् सुरु झाला एक निःशब्द प्रवास.. .शांत, गूढ... एकाकी...  पात्रातल्या खळाळत्या आवाजाची काय ती एक सोबत आणि मधूनच हळूहळू वाहणारा वारा. बस्स ! या चिरपरिचित वातावरणानं रमा उत्तेजित झाली. आता तर पावलांनाही ओढ जाणवू लागली होती. ऊरही भरून येऊ लागला होता. पाहता पाहता तिची प्रतीक्षा संपली. आणि ती मुक्कामी पोहोचली. जणू काही जग जिंकावं इतका आनंद तिला झाला. हा क्षण... आपण पुन्हा पाहू शकू की नाही, अनुभवू शकू की नाही याबाबत ती साशंकच होती. पण अखेर आजही तिला हे सारं काही पाहायला, अनुभवायला मिळालं होतं. नियतीच्या या औदार्याप...

तारेवरच्या कसरती

व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असो ती संवेदनशील, विचारी असेल तर तिचं जगणं अर्थपूर्ण आणि अनुभव संपन्न होतं. असं जगणं जेव्हा साहित्यात प्रतिबिंबित होतं तेव्हा साहित्यही खऱ्या अर्थानं व्यापक, बहुस्पर्शी होतं. असंच, आपल्या जगण्यातनं आलेल्या अनुभवाचं संचित; कथात्मक स्वरूपात मांडलं आहे; ते लेखक विलास गावडे यांनी, ‘तारेवरच्या कसरती’ या त्यांच्या औद्योगिक जगताचं म्हणजेच कामगार विश्वाचं दर्शन घडवणाऱ्या दुसऱ्या कथासंग्रहात. खरंतर आजवरच्या चित्रपट, कथा, कादंबऱ्या, कविता यातून वेळोवेळी औद्योगिक विश्व सामोरं आलेलं आहे. पण पुष्कळदा यातून कामगार म्हणजे केवळ ‘शोषित’ घटक इतकीच संकुचित प्रतिमा निर्माण व्हावी असं त्याचं सादरीकरण झालं आहे. प्रत्यक्षात जरी ते खोटं नसलं तरी केवळ तितकंच खरं आहे असंही नाही. शिवाय अशा प्रकारे दाखवण्यात येणारं कामगार विश्व हे बऱ्याचदा अतिरंजितही आहे. मग खरं काय आहे? कामगार म्हणजे केवळ संप, हरताळ, उपोषण, मोर्चा इतकंच आहे का? कामगारांच्यात आणि वरिष्ठांच्यात काहीच स्नेहबंध, आपुलकी नसते का? कामगारांच्या उत्कर्षासाठी काहीच तरतूदी नाहीत का? कारखान्यात, कंपनीत कधीच...